मधल्या पिढीचं ‘लटकणं’ आणि त्यावर होमिओपॅथिक उपचार
प्रसंग एक –
मी माझ्या एका मैत्रीणीकडे, सुषमाकडे तिला नात झाली म्हणून आंम्ही बघायला गेलो होतो. ती खूप दमलेली दिसत होती. तिच्या नातीला पाहिलं. तिच्याशी आंम्ही खेळलो. मग बाळाला भूक लागली म्हणून तिची आई तिला आत घेऊन गेली. तेवढ्यात सुषमा आमच्यासाठी कॉफी घेऊन आली, म्हणाली, मी या सासूबाईच्या अपेक्षांनी दमून गेले आहे. मला नात झाली. त्याच्या काही दिवस आधी माझी गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया झाली, तरी नातीचं सगळं काही ना काही मी करते आहे. मुलीचं बाळंतपण ही नीट करते आहे. अगदी आता मी आहे, त्याच वयाच्या माझ्या सासूबाई असताना त्यांचेही हेच ऑपरेशन झालं होतं…… तेव्हा मी त्यांचं सगळं काही करत होते. तेव्हा कधी थोडा वेळ माझ्या मुलीला म्हणजे त्यांच्या नातीला घ्या म्हटलं, तर म्हणायच्या, ” माझं आताच ऑपरेशन झाले आहे. मला नाही झेपत.” पण आजही मला काही त्रास होत असेल तर, ना त्या समजून घेत ना मुलगी. त्यांच्याशी कसं वागाव हेच कळत नाही !”
प्रसंग दोन –
आमचा मित्र अजित मला फोनवर सांगत होता,“अरे जरा माझ्या आईला समजावून सांग ना एकदा की, डायपर वापर म्हणून.आता 80 वर्षाची आहे ती. मला कळतंय की, तिला कधी कधी लघवीवर ताबा राहत नाही. पण मग डायपर घालावा ना…… कुठेही पटकन लघवी करते. मी तिचा मुलगा आहे म्हणून समजून घेतो. माझी बायको पूनम खूप समजूतदार आहे. माझी आई म्हणून ती काही बोलत नाही रे ! पण तिला हे सगळं सहन करावं लागतं. तिला कधी कधी खूप त्रास होतो. मग, थोडा वेळ आम्ही दोघं घराबाहेर जातो आणि सोसायटीच्या बागेत बसतो. परत घरी गेलो की, आईची पुनमच्या नावाने भुणभुण सुरू होते, “काय सारखी मध्ये मध्ये भटकायला जातेस ? कुठे गायब होतेस ? मग त्यावर पूनमची चिडचिड; पण आईने डायपर वापरला तर कितीतरी प्रश्न सुटतील. आई काही केल्या ऐकत नाही……. प्लीज तू सांगून बघतोस का एकदा आईला. “
प्रसंग तीन-
सकाळी चालण्याच्या वेळी दोन मैत्रिणी गप्पा मारत होत्या. एक मैत्रीण दुसरीला म्हणाली,“तुझं बरं ग बाई, तुझा मुलगा परदेशी राहतो. मुलगा नातवंड चार-आठ दिवस येतात. त्यांचं, नातवंडांचे कौतुक केलं, की मग तू मोकळी. माझा मुलगा असून अगदी आमच्या घराजवळच राहतात. सून तसं खूप काही करियर वगैरे करत नाही; पण नातवाला सांभाळण्यासाठी आम्हाला गृहीतच धरते……. कधी शाळेतून आणा, क्लासला सोडा…..कधी मुलांना पार्टीला जायचं झालं तर मुलगा अचानक फोन करून नातवाला राहायला पाठवतो. आमची एक नातेवाईक म्हणतात, या वयात तुम्ही परत आई बाबा झालायं असंच वाटतं ! तुम्ही जबाबदाऱ्या कमी करायच्या ऐवजी वाढवतायच की ! “
प्रसंग चार –
माझ्या माझा वृत्तपत्रातला एक लेख वाचून माझ्या कॉलेजमधल्या मित्राचा फोन आला. ” आत्ताच आलो ऑफिसमधून. खूप छान लिहिलयस ! पण म्हटलं, आज शनिवार संध्याकाळ. तुला आजच फोन करावा आणि अभिप्राय कळवावा. नाहीतर ही माझी ही वेळ अमेरिकेतल्या मुलीशी बोलण्याची असते. त्यावेळी मी इतर कोणाशी बोलत नाही; पण शनिवार – रविवार मी तुला फोन करत नाही आणि तिलाही सांगतो, तू पण करू नको…..तुमचा वीकेंड आहे ना, मी नाही तुम्हाला त्रास देणार, आठवडाभर कामात असता, घ्या तुम्ही पण विश्रांती ! “
वर नमूद केलेल्या चारही प्रसंगावरून असं लक्षात येतं की, ही तक्रार करणारी मंडळी साधारण 50 ते 60 वयोगटातले आहेत. त्यांना घरातल्य घरातल्या घरातल्या त्यांच्यापेक्षा वरिष्ठ लोकांचं करताना त्रास होतोय. त्याचबरोबरीने घरातले कनिष्ठ अर्थात मुलाबाळांच्या अपेक्षा पूर्ण करता करता ते थकून जात आहेत. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आयुर्मान वाढलं आहे आणि नव्या तंत्रज्ञानामुळे नवी पिढी व्यग्र झाली आहे.
त्यामुळे या मधल्या पिढीला अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढायला लागते. आपल्यापेक्षा मोठे म्हणून त्यांचा ज्येष्ठांचा मान राखणं, त्यांचा औषधपाणी, रुग्णालय, पथ्य, पेन्शनची कामं, बँकेची कामं, त्यांचं मनोरंजन, त्यांना नातेवाईकांकडे घेऊन जाणं किंवा त्यांना भेटायला आलेल्या लोकांसाठी वेळ काढून काही करणं करावे लागतंय, तर दुसरीकडे आपल्या मुलांनाही मदत करणं, त्यांचे करियर चांगलं व्हावं म्हणून त्यांचं मूल सांभाळणं त्यांच्या ऑफिसच्या पाहून आपल्या गोष्टी ठरवणं.
सून किंवा मुलगी यांचं बिझी रुटीन म्हणून त्यांचे घर सांभाळणं, त्यांना त्यांच्या मुलांना वेळ देता येत नाही, त्यांची भरपाईसुद्धा आपणच करणं, नातवंडांनी घरचं खावं म्हणून त्यांच्या आवडीचे पदार्थ घरी करणं, घरातल्या तरुण पिढीचं ‘डाएट’ सांभाळणं, घरातील छोटी मोठी काम करावं लागते काम छोटी-मोठी काम करणं, करावं लागतंय आणि कामांची ही यादी संपतच नाही. हे सगळं करताना मधल्या पिढीची दमछाक होते.
मधल्या पिढीची ज्येष्ठांबरोबर वागताना अशी मानसिकता असते की, ‘ यांची आता वयं झाली आहेत. गेल्या अनेक वर्षे त्यांनी कष्ट केले आहेत. मोठ्यांना उलट बोलू नये, त्यांचा अपमान करू नये, त्यांचे आता कितीसे दिवस राहिलेत …… ? ‘
काही ठिकाणी हेही दिसून येते की , 75 उलटलेले लोक यामध्ये लोकांच्या वयाची, त्रासांची अजिबात दखल घेत नाहीत, जो समजूतदारपणा त्यांनी पुढच्या पिढीत रुजवायला, तो त्या पिढीशी वागताना ते का वापरू शकत नाहीत ? त्यांच्या वयामुळे त्यांच्यातला विवेक गेला असेल का ? की वयामुळे ते आत्मकेंद्री तर होत नाहीत ना ? असा प्रश्न पडतो.
खूप ठिकाणी मध्यम वयाची पिढी संयम आणि समजूतदारपणा दाखवून तरुण पिढीला, आपल्या मुलांना वैचारिक स्वातंत्र्य देऊन करिअर, जोडीदार, त्यांचं राहायचं ठिकाण निवडण्याची मुभा देत आहेत, त्यांची ‘ प्रायव्हसी’ जपत आहेत. तसेच, त्यांच्या संपर्कात राहता यावं, त्यांचं काय चाललं आहे हे कळावं, म्हणून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून, मोबाईल, कॉम्प्युटर सारखी साधनं वापरून समाजमाध्यमं हाताळून त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण कधी कधी त्यामुळे तरुण मंडळींना ती पालकांची लुडबुड वाटते.
मधल्या पिढीतील काही मोजकेच लोक असे दिसतात की, ज्यांच्यावर जेष्ठांची जबाबदारी नाही किंवा काही ना काही कारणानं मुलांची किंवा नातवंडांची जबाबदारी नाही; पण असे लोकही आपल्या वयाच्या इतर लोकांच्या समस्या समजून घेताना दिसत नाहीत. उलट ‘तुम्ही फार अडकून पडता या सगळ्यात…..’ अशी इतरांची चेष्टा करताना दिसतात किंवा ‘मोकळे व्हा सगळ्यातून,’असा आग्रह सुद्धा करतात धरतात.
माझी कॉलेजमधली एक मैत्रीण आहे ती तिच्या आईला सांभाळते, मुलीच्या करिअरसाठी ‘सपोर्ट‘ व्हावं म्हणून नातीला सांभाळते. ती नेहमी म्हणते, “आपली पिढी म्हणजे जात्यातले ही आम्ही आणि सुपातलीही आम्हीच !”
या मधल्या पिढीच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, यातल्या स्त्रियांना जास्त कसरत करावी लागते आणि याच वयातले पुरुष मात्र बऱ्याच वेळेला थोडी तटस्थ भूमिका घेतात. शिवाय ते आपल्या बायकोला, बहिणीला किंवा वहिनीला सहज सांगून जातात की, ‘नको लक्ष देऊ ! हे तुला आता माहीतच आहे ना ? मोठी माणसं अशीच वागणार ! किंवा त्यांचीच मुलं बेजवाबदारपणे वागली तरी घरातल्या स्त्रीलाच दोष देतात की, ‘तूच सवयी लावल्यास या ! मग आता काय अपेक्षा करतेस ?
इथे पुरुषांनी आपल्या बरोबरीच्या स्त्रियांना समजून घेऊन सहकार्य करणे गरजेचे आहे.
मधली पिढी म्हणजे ज्यांना घरातल्या वरिष्ठांचंही करायला लागतं आणि कनिष्ठानचंही. अनेकदा हे वरिष्ठ आपल्या वय होत चाललेल्या मुला सूनेकडून अनेक अवाजवी कामांची अपेक्षा करतात, तर कनिष्ठांची पिढी ही आई-वडिलांकडून तीच अपेक्षा करते. त्यामुळे कोंडी होते ती मधल्या पिढीची !!
वर दिलेले चारी उदाहरणामधील व्यक्ती हे माझे पेशंट असून त्यांना होमिओपॅथिक औषध दिल्यामुळे त्यांना लक्षात आले की, त्यांना काय करायला जमेल आणि काय करायला जमणार नाही, हे आत्मपरीक्षण करणं आणि त्यांनी ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं. जिथे जमतय तिथे योग्य वेळी स्वतःसाठी ‘नाही ‘ म्हणणं त्यांना जमायला लागलं. हा होमिओपॅथिक औषधाने त्यांच्यामध्ये झालेला बदल आणि ‘नाही ‘ म्हणताना त्यांच्यामध्ये अपराधीपणाची कोणतीही भावना राहिली नाही आणि तो बदल त्यांनी सहजपणे स्वीकारला.
या मधल्या पिढीतील लोकांचा त्रास कमी करण्यासाठी काय काय करता येईल ?…
- तर दोन्ही पिढ्यांनी एकमेकांशी त्यांच्या त्यांच्या भाषेत मोकळा संवाद वेळेवर साधायला हवा.
- मला काय करायला जमेल आणि काय जमणार नाही याचे आत्मपरीक्षण करून ते आधीच्या आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे.
- योग्य वेळी स्वतःसाठी ‘नाही ‘ म्हणणंही जमलं पाहिजे.
- मोठ्यांना किंवा लहानांना मदत करता आली नाही किंवा त्यांना आनंदी ठेवता आले नाही तर अपराधीपणाची जाणीव न ठेवता काही गोष्टी आपल्याला आपल्याही वयानुसार करता किंवा बदलता येणार नाहीत हे सत्य स्वीकारलं पाहिजे.
हा बदल स्वीकारण्यासाठी होमिओपॅथिमध्ये अनेक प्रकारची गुणकारी औषधे आहेत ज्यामुळे रुग्णांच्या किंवा त्या व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये बदल होऊन तारतम्याने विचार करता येऊ लागतो. त्यामुळे “सुपातले जात्यात जाताना ” चा बदल सहजगत्या होऊ शकतो. त्यामुळे मधल्या पिढीतले उतारवयातले जीवन सहज सुंदर आणि आनंदाने जगता येणे शक्य आहे. जर प्रत्येक पिढीने दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून त्या त्या पिढीच्या समस्या समजून घेऊन त्यानुसार स्वतःमध्ये विचारपूर्वक काही बदल केले, तर प्रत्येक पिढीच्या समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकतील आणि ‘सुपातले जात्यात जाताना’ तो बदल सगळ्यांसाठीच सुसह्य होईल.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123,9404507723
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —